२० तारखेपासून लालपरी पुर्ण क्षमतेने सुरु होणार

मुंबई: राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. सध्या सुरु केलेली बससेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही.

कर्नाटक आणि गुजरातमध्ये १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून पूर्ण आसनक्षमतेने करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याआधी २० जुलैला सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.

अटी काय आहेत……….
– बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक

– वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात

– लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापी पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!