बारामती(वार्ताहर): साईबाबांचे अमूल्य विचार घेऊन बिरजु मांढरे मनापासून काम करून नागरीकांच्या समस्या सोडविण्या साठी प्रयत्न करतात असे प्रतिपादन बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.
मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या संकल्पनेतून साईच्छा सेवा ट्रस्टने बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीच्या प्रस्थान प्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.
या प्रसंगी नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजीत जाधव, नवनाथ बल्लाळ, राजेंद्र बनकर व तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील, विजय खरात, आणि किशोर मासाळ, अजीज शेख, सुजित जाधव, भारती मुथा, दिनेश जगताप,के.टी जाधव, राहुल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे सौ.पवार म्हणाल्या की, सामाजिक एकात्मता जोपासत साईच्छा सेवा ट्रस्टने केलेले कार्य कौतुकास्पद असून साई बाबाचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, श्रद्धा व सबुरी जी साईबाबांची वचने आहेत. त्यापैकी श्रद्धा कशी ठेवावी हे बिरजू मांढरे यांच्याकडे पाहिल्यानंतर कळते. अलिकडच्या काळामध्ये दाखवायची श्रद्धा वेगळी निभवायची श्रद्धा वेगळी असे स्वरूप दिसून आले. सबुरी बिरजु मांढरेच्या राजकीय, धार्मिक व व्यावसायिक प्रवासातून दिसून येते. बिरजु मांढरे यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण होत गेले आहेत यामध्ये बिरजु मांढरे यांचा पाठपुराव्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत त्याचठिकाणी उभारली गेली. काही प्रलंबित कामामुळे लाभार्थ्यांना देण्यास विलंब लागत आहे. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देण्याचा प्रयत्न आहे.
आमराईत सर्वच विकास कामे पूर्ण झालेली आहेत. आमराई विभागातील सर्वच नगरसेवकांनी कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत उभारली त्याचप्रमाणे साळवेनगर येथील काम सुरू करण्यासाठी बिरजु मांढरे यांचा सतत पाठपुरवा व मागणी आहे. साईबाबांच्या वचनाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन बिरजू मांढरे समाजात काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दहा वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षात पदार्पण करताना बारामती बरोबरच इंदापूर, दौंड, फलटण व नगर जिल्यातील अनेक साईभक्त सहभागी होत असतात शिर्डी मध्ये गुजरात, आंध्र प्रदेश,व महाराष्ट्रातून अनेक साई पालख्या येतात परंतु शिस्तबद्व व साई विचार तळागाळात पोचविणारी बारामती तालुक्यातील एकमेव साईच्छा सेवा ट्रस्टची पालखी लक्ष वेधून घेत असते पालखी च्या माध्यमातून अध्यात्मिक समाधान मिळत आल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
याप्रसंगी जय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पालखी सोहळ्यातील वाहक हरिभाऊ केदारी, गौंड व वासुदेव यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले
सौ सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवस व दीपावली पाडव्याचे औचित्य साधत बुधवार 26 ऑक्टोबर 2022 रोजी साईबाबांच्या जीवनावर आधारित ’साई दरबार’ या जगातील सर्वात महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.