एकनाथराव शिंदे तुमचं अगदी मनापासून कौतुक केवढा मोठा ऐतिहासिक प्रसंग तुम्ही तुमच्या अंगभूत धाडसाच्या जोरावर घेवून लोकशाही प्रक्रियेतील महत्वाच्या भागाचा आणि हिरमुसलेल्या सहकार्यांच्या अस्मितेचा जो तुम्ही आदर सर्वांसमोर ठेवला आहे तोच अतिशय धाडसाचा आणि तुमच्या कौतुकाचा भाग आहे. तुम्ही शिकविलेला धडा किती मौलिक आहे याचे भान ज्यांना येईल तेच शहाणे!
भल्याभल्यांच्या मुस्कटात लगावण्याचे धाडस देखील तुमच्यात आहे हे सार्या देशाने काल पाहिले. धन्य झालो आम्ही. एकनाथराव शिंदे साधे आहेत, समंजस आहेत, शांत आहेत हे सर्वांनाच ज्ञात होते. परंतु ते किती कडवे सुद्धा आहेत, ठाममताचे आहेत, अचूक निर्णयाची चुणूक दाखविणारे आहेत हे त्या नेत्यांना देखील काल कळले. नेत्यांची अवस्था अक्षरश: दयनिय झालेली काल सर्वांनाच पहायला मिळाली. तो आगलाव्या संजय राऊत भरभरून बोलत होता. दिवसभर सारखी तिच कटकट ऐकून लोक कंटाळले. टी.व्ही.वाले शहाणे किती? लोकांनी टी.व्हीच बंद केले.
कित्येकांची दिवसभर पळापळच चालू होती. एकनाथरावांनी त्यांच्या बाजूने परतीचे दोर कापले हे मिलिंद नार्वेकर यांच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य ऐकले आणि महाराष्ट्रानं, तमाम महाराष्ट्रानं टाळ्याच ठोकल्या. संजय राऊत किती शहाणा आहे हे उद्धव ठाकरेंना कळू नये हेच दुर्देव! देवानं संधी दिली पण तुम्ही काय केलं याचा अगदी मनापासून विचार केलात तर तुम्हालाही कळेल सगळं काही तुमचचं चुकलयं ते! अहो जास्त कशाला तुम्हाला तुमच्याच लोकांशी बोलण्याची सुद्धा गरजच वाटत नव्हती हे तुम्ही स्वत:च विसरलात का? सत्य फार अघोरीही असतं ह्याचा प्रत्यय तुम्हाला आलाय हेच खरं त्यातलं तथ्य!
असा खर्या सत्याचा साक्षात्कार आणखीकाही नेत्यांना नक्कीच झाला पण ते खुल्या दिलानं तसं मानणार्यातले नाहीत. सगळ्या प्रकाराला संजय राऊतच जबाबदार आहे. आणि तुम्ही त्याला साथच देत होता त्यामुळे तो दिवसागणिक फुगतच होता हे समजून घ्यायलाच लागेल तुम्हाला तुमच्या सगळ्या जुन्या नव्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिसत होते ते आपापसात बोलतही होते. परंतु, तुम्ही मात्र झोपेच सोंग घेवून होतात त्याला कोण काय करणार? अशा स्थितीत कार्यकर्त्यां आया बहिणींनी शिंद्यांना कितीही शिव्याशाप दिले तरी भगवंताला त्यांची किवच येईल. किता भाबड्या आहात सगळ्या जणी! असंच म्हणेल हो तो भगवंत! कुठे आहात तुम्ही. सगळा प्रकार नीट समजून घ्याना उगाचचं धिंगाना घालण्यात काय अर्थ! नंतर तुम्हालाच ओशाळल्यासारखं होईल. एकनाथराव शिंदे म्हणाले, सगळ्यांच्या हितासाठी भा.ज.पा. बरोबरच सरकार स्थापन करा, मला मंत्री मंडळात घेऊही नका, मी कुठेही गेलो नाही आणि जाणारही नाही. आणखी काय हवे.
द.रा.पवार (ज्येष्ठ पत्रकार)
संपर्क : 8805158190