युती व महाआघाडी सरकार एस.टी.कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळत आहेत : मागण्या मान्य न केल्यास वंचित बहुजन आघडीचा आंदोलनाचा पवित्रा

बारामती(वार्ताहर): मागील युती सरकार व सध्याचे महाआघाडी सरकार एस.टी.कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळत आहेत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी याप्रसंगी दिला.

राज्यात एस.टी. कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. बारामतीत सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा, बारामती तालुका व शहराच्या वतीने पाठिंबा दर्शविताना श्री.निकाळजे बोलत होते.याप्रसंगी शहर अध्यक्ष अक्षय शेलार, ऍड.रियाज खान, ता.संघटक ऍड. विवेक बेडके, ऍड.तुषार ओहाळ,विक्रम थोरात, अक्षय चव्हाण,कृष्णा क्षीरसागर, स्वप्निल कांबळे, मयूर कांबळे, रोशन निशाद उपस्थित होते.

राज्य शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे. एसटी आगारात सुरू असलेल्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनास दडपण्यासाठी कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्याचा तसेच नोकरीतून बडतर्फ करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!