गोतोंडी येथील साई वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय

गोतोंडी(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत साई तात्याराम बनसोडे (वय 9) याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून गोतोंडी गावचे नाव महाराष्ट्रात लौकिक केला आहे. त्यामुळे गावातील वातावरण चैतन्यमय झाले.

गोतोंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे यांनी यानिमित्ताने साई बनसोडे यांचा सत्कार घेतला होता. त्याच बरोबर इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्षपदी काशिनाथ शेटे यांची तसेच मुंबई वृत्तपत्र वहिनी संघाच्या सरचिटणीसपदी अशोक घोडके यांची नियुक्ती झाल्याने ग्रामपंचायत च्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे, आप्पा पाटील, अनिल खराडे, माजी सरपंच सोभना कांबळे, पोलीस पाटील हरिभाऊ खाडे, आबा मारकड, बिभीषण नलावडे, संजय बिबे, बापू पिसे, मारुती नलवडे, ग्रामसेवक लोणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!