एकऽऽ..मिनीट…जास्त आवाज करायचा नाही…निवडून दिले म्हणून काहीही बोलायचे का? मी सांगेल तोच भाव द्या..मी सांगेल ती गावे घ्या…मी काय केले नाही तुमच्यासाठी… माझ्याशी गाठ आहे…पहाटे माझ्याकडे का आला नाही….सभासदांनोऽऽ… हे वाक्य कानी पडायच्या आधीच सहकार बचाव पॅनेलला बहुमताने निवडून द्या…

बारामतीः साखर उद्योगाचा मूलभूत पाया म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ऊस उत्पादक शेतकरी आहे. कारखान्याचा एक भागीदार साखर उत्पादन साखळीचा पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी होय. जर एवढं सगळं ऊस उत्पादक शेतकऱ्यास बोललं जाते तर या ऊस उत्पादक शेतकरी सभासदाचा आवाज का दबला जातो हे सभासदांनी जाणले पाहिजे.

एकऽऽ..मिनीट…जास्त आवाज करायचा नाही…निवडून दिले म्हणून काहीही बोलायचे का? मी सांगेल तोच भाव द्या..मी सांगेल ती गावे घ्या…मी काय केले नाही तुमच्यासाठी…पहाटे माझ्याकडे का आला नाही….सभासदांनोऽऽ… हे वाक्य कानी पडायच्या आधीच सहकार बचाव पॅनेलला बहुमताने निवडून द्या. अन्यथा तुम्हाला पाच वर्ष अशा वाक्यांना सामना करावा लागेल. कारखान्याचे मालक तुम्ही असताना…दुसऱ्याची बोलणी का खावी असा खरा प्रश्न पडतो.

सहकार बचाव पॅनेलचे नेतृत्व ज्येष्ठ संचालक, साखर कारखान्याचे तज्ञ चंद्रराव (आण्णा) तावरे आणि रंजन (काका) तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आण्णा गेली कित्येक वर्ष कारखान्याचा कारभार हाताळतात त्यांनी कधीच सभासदांना एकऽऽ..मिनीट…जास्त आवाज करायचा नाही…असे म्हटले नसेल. निवडून दिले म्हणून काहीही बोलायचे का? मी सांगेल तोच भाव द्या..असे काका कधी बोलले नसतील. सत्ताधाऱ्यांचा जरी पक्ष असला तरी चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांचा आण्णा-काका पक्ष आहे. या पक्षाला कधीच निधी द्यावा लागत नाही किंवा यांच्या मागे-पुढे करावे लागत नाही. हे दोघे कारखान्याचा ठेका घेत नाही किंवा आम्ही सांगेल त्यास ठेका द्या असे म्हणत नाही. कोणत्याही वेळी, ठिकाणी हे आण्णा-काकाचा पक्ष सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी उपलब्ध असतो हे कोणीही नाकारू शकत नाही.

निवडणूका म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप असतो. बारामती लोकसभा व विधानसभा मतदार संघातील मतदार खुप हुशार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी तिसरा डोळा उघडूनच मतदान करतो हे त्रीकाल सत्य आहे. बारामती लोकसभेला मतदारांनी काय केले आणि विधानसभेला काय केले हे कोण्या ज्योतिष्याने सांगण्याची गरज नाही. मग आज तिसरा डोळा उघडून मतदान करणाऱ्या सभासदांच्या रोजी-रोटीचा प्रश्न आहे. त्यामुळे कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा हे सुज्ञ सभासदांना सांगण्याची गरज नाही.

सभासदांना प्रश्न आहे…जर तुम्ही तुमच्या शेतात फेरफटका मारण्यास निघाला आणि ट्रॅक्टर चालकास म्हणाला..तू माघून ये मी पुढे चालत जातो. काही वेळ चालल्यानंतर माघून येणारा तुमच्या मालकीचा ट्रॅक्टर तो चालवणारा तुमचा नोकर तुम्ही हातद्वारे करूनही थांबला नाही तर तुम्ही काय कराल… अशीच परिस्थिती सध्या माळेगांव कारखान्यावर सभासदांची झालेली आहे. ही यापुढेही होऊ नये म्हणून सभासदांनी ठामपणे सहकार बचाव पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

सभासदांनी सत्ताधारी पॅनेल व त्यामध्ये असणारे उमेदवार आणि सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवारांचा फरक पाहिला तर तिथंच कळेल. सत्ताधाऱ्यातील होणारे संचालक हे सभासदांसाठी नव्हे तर स्वतःच्या भूषण, वर्चस्वासाठी व मिरवण्यासाठी विशेष नेत्याच्या पुढे…पुढे करण्यासाठी होतील. सहकार बचाव पॅनेलचे होणारे संचालक सर्वसामान्य सभासदांचा विचार करून जमीनीवर चालणारे होतील विशेष म्हणजे या संचालकांना कोणत्या नेत्याच्या पुढे…पुढे करण्याची गरज नाही कारण या पॅनेलचे प्रमुखच या संचालकांच्या मागे..मागे असतील. तुम्ही पुढे व्हा…आम्ही आहोत पाठीमागे असे म्हणणारे असतील.

सहकार बचाव पॅनेलच्या संचालकांना कोणा नेत्याला विचारण्याची गरज नाही. ते संचालक स्वतः चेअरमन असल्यासारखे प्रत्येक गोष्टीत लक्ष देतील. त्यांना का बोलला म्हणून कोणता नेता विचारणार नाही किंवा चार चौघात फडाफडा बोलणार नाही, पानउतारा करणार नाही. सत्ताधाऱ्यांना कारखान्यात पाय ठेऊन काही बोलायचे म्हटलं तरी नेत्याची परवानगी घ्यावी लागणार, मागील काळात एका संचालकाने अशीच हुशारगी दाखविली त्यास नेत्यांनी काडीमोल किंमत दिली नाही असेही सभासदांमध्ये बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!