सागर मिसाळ यांच्या थाळीनाद आंदोलनामुळे शासन खडबडून जागे झाले…

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके) : राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांच्या थाळीनाद आंदोलनामुळे शासन चांगलेच खडबडून जागे झाले आणि तब्बल तीन महिन्यापासून रखडलेले अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले.

संजय गांधी निराधार योजनेचे शासकीय अनुदान गेली तीन महिन्यापासून रखडले गेले होते. अनुदान त्वरित जमा करण्याच्या मागणीसाठी इंदापूर तहसील यांच्यासमोर सागर मिसाळ यांनी थाळी बजाव आंदोलन केलेे. या आंदोलनाची दखल घेत शासन खडबडून जागे झाले आणि मागील तीन महिन्याचे रखडलेले अनुदान महिना 1500 प्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावरती 4 हजार 500 रुपये अनुदान शासनाने जमा केले आहे.

शासनाने 2 कोटी 75 लाख रुपये सरासरी निधी जमा केला असल्याची माहिती सागर बाबा मिसाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!