2014 ला देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला का पाठवलं? -ना.अजित पवार

मुंबई: 2014मध्ये आघाडीचे सरकार गेले आणि भाजपा, शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं होतं. जर त्यांच्याबरोबर जायचे नव्हते तर आम्हाला तिथे का पाठवले? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

2017 मध्ये वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत राष्ट्रवादीतर्फे मी, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ होतो. तर भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्या दोघांमध्येही पाचवेळा बैठक झाली. आम्हाला सांगण्यात आले की बाहेर काहीही बोलायचे नाही. असाही गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. महाविकास आघाडीच्या काळातही भाजपासह सत्तेत सहभागी व्हायचे पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिले होते. मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी एक ड्राफ्ट तयार केला. हसन मुश्रीफ यांनी विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. आपली कामे व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावे अशी विनंती आमदारांनी केली होती असेही पवार म्हणाले. शरद पवार हे भावनिक होत कार्यकर्त्यांना, आमदारांना आवाहन करतात. एक आमदार नाव न घेता अजित पवार म्हणाले त्या आमदारास शरद पवारांनी सांगितले अजित पवारासह जाऊ नको. तेव्हा त्या आमदाराने शरद पवारांपुढे हात जोडले आणि म्हणाले की मी अजित पवारांना शब्द दिला आहे. त्यावर त्याला तू निवडून कसा येतोस तेच मी बघतो अशी धमकी शरद पवार यांनी दिली होती असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!