विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ – एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजीद बिल्डर यांचे वक्तव्य

एमआयएमचा जिल्हा मेळावा संपन्न

नगर(प्रतिनिधी)ः ‌‘स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुस्लीम समाजावर अपशब्द वापरले असून दर्गा, मस्जिद व जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, काळजी करू नका विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची ताकद फक्त एमआयएमकडे आहे, असा इशारा एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी दिला.

महाराष्ट्रात एमआयएम पक्षाला बळकट करण्यासाठी राज्याची कोर कमेटीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्राची सुरूवात नगर येथून करण्यात आली. नगर येथे जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळाव्याज समीर साजिद बिल्डर बोलत होते.

नगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी नगरची माहिती देत असतांना सांगितले की, अहमदनगर मध्ये जेव्हा आम्ही एमआयएम चे काम सुरु केले तेव्हा लोक कोणताही प्रतिसाद देत नव्हते. परंतु आज चांगल्या चांगल्या नेते आणि आजी माजी लोक प्रतिनिधी एम आय एम सोबत येण्यास तयार आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी देणार असल्याचेही पक्ष श्रेष्ठींना सांगितले. येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक असो की जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो एम आय एम आपल्या हिस्स्याचे लोक प्रतिनिधी निवडून आणतील.

प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले की, महानगर पालिकेत एम आय एम चे उमेदवार निवडून द्या. विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जनतेला दाखून देऊ. अतिक अहमद मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पक्ष बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व समाजाला ज्यांच्यावर अत्यचार करण्यात आले आहे त्यांना एकत्र घेऊन सत्तेत भागीदारी घ्यावी लागेल. येणारा काळ एमआयएम साठी सुवर्णकाळ असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयएम सोबत कसे जुडले आणि कसे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला यावर युसुफ पुंजानी यांनी भाष्य केले. एमआयएम सोबत एक कार्यकर्ता या नात्याने जुडलो आणि समाजाचे काम करत गेलो. माझ्या कामाची विरोधकांनी इतकी धास्ती घेतली की मला खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात टाकले.परंतु आज खासदार ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन प्रदेश सहसचिव पदाची जबाबदारी दिली असे मत सैफ पठाण यांनी मांडले.

जो पक्षासाठी निष्ठावंत आहे पक्ष त्याच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार. कोणीही पक्ष विरोधी कारवाई केली तर त्याला पक्षात कोणतेही स्थान नसणार अशी भूमिका शफीउल्ला काझी यांनी परखपडे मांडली.

यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ शेख, युवा अध्यक्ष अमीर खान, शेवगाव अध्यक्ष युसुफ शेख, कर्जत अध्यक्ष डॉ अन्सार, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, सरफराज सय्यद, इम्रान देशमुख, इस्माईल शेख, शम्स शेख, नासीर शेख, आवेज शेख, नदीम तांबोळी, शोएब पठाण, सज्जाद शेख आदी उपस्थिती होते.

येणाऱ्या काळात एम आय एम ची सत्ता स्थापनेसाठी महत्वाची भूमिका असणार असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने एम आय एम मुळे किधर ख़ुशी किधर गम असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!