राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला पडला संविधानिक घेतलेल्या शपथीचा विसर: उपमुख्यमंत्री ना.अजित पवार संग्राम जगतापाच्या मुसक्या आवळणार का? संतप्त मुस्लीम समाजाच्या प्रतिक्रीया

बारामती(प्रतिनिधी): विधिद्वारे स्थापित भारताचे संविधान निष्ठापूर्वक आणि सचोटीने आचरणात आणीन, भारताची एकता आणि एकात्मता कायम राखेन आणि ज्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत, त्या निष्ठेने पार पाडेन ही घेतलेल्या शपथीचा विसर सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना पडलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या आमदाराच्या मुसक्या आवळणार का? याबाबत मुस्लीम समाजाच्या तीव्र प्रतिक्रीया उमटत आहे

26 जून 2025 रोजी समस्त मुस्लीम जमात अहमदनगर यांच्या वतीने मुस्लीम, ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व न्यायालयाची आदेशाची पायमल्ली करणारे संविधान विरोधी आ.संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्याबाबत जमातीचे प्रदेश महासचिव डॉ.परवेज अशरफी यांच्या पुढाकारातून समस्त मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर (जि.लातूर) येथून तालुका अध्यक्ष सत्तार हबीबसाब शेख यांनी व सकल मुस्लीम समाजाच्यावतीने 26 जून 2025 रोजी आ.संग्राम जगताप यांनी बेताल वक्तव्याबाबत निषेध नोंदवून राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.

शिव,शाहू,फुले, आंबेडकर विचारधारा असणाऱ्या महाराष्ट्रात आ.जगताप हे सतत मुस्लीम समाजाबद्दल (लांडे) असे अपशब्द वापरून समाजाच्या भावना भडकवीत आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक, धार्मिक वातावरण बिघडवत आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका भाषणात आ.जगताप म्हणाले की, जहाँ आयेंगा लांडा वहाँ आयेंगा डांडा आणि जहा आयेंगा अली वहाँ आयेंगा बजरंगबली अशी आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लीम समाजाबाबत अतिशय खालच्या पातळीवर जावून टीका टिपण्णी करून समाजाच्या भावना भडकविल्या आहेत.

कर्जत सिद्धटेक येथे प्रसिद्ध गणपती मंदीराजवळ एक अनाधिकृत मजार उभारण्यात आली होती. आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मजार हटविण्यात आली. तेव्हापासून जगताप हिंदूत्ववादी भूमिका घेण्यास सुरूवात केली. त्याच प्रमाणे पाथर्डी येथील मढी देवस्थान परिसरात मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली. शनिशिंगणापूर येथे मुस्लीम कर्मचाऱ्यांबाबत वाद झाला. शिर्डी साई संस्थानातील हजर बाबांच्या कबरीबाबत वाद व जवखेडे खालसा येथील दर्गा-मंदीर वाद अशा विविध प्रश्न निर्माण केले गेले आणि दोन समाजात सतत वाद तेवत राहील हा उद्देश यामधून दिसून येत आहे.

डॉ.परवेज अशरफी यांची महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणास तक्रार:-
मे.न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना जातीवादी संघटनेला आणि जिल्ह्यातील दोन आमदारांना दर्ग्यात घुसून आरती करू देणाऱ्या अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक आणि त्यांचेसह सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसून केल्याने गुन्हा दाखल करणेबाबत तक्रार दाखल केलेली आहे.

अल्पसंख्यांक आयोगाचा दणका: 7 दिवसाच्या आत कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आदेश
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यात सतत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याने आणि कोणत्याही कार्यक्रमात मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजा विरोधात आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या नगरचे आमदार संग्राम जगताप यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाने नगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले आहे. मुस्लिम समाज विरोधात सतत आक्षेपर्य वक्तव्य करणारे आणि जवखेड खालसा येथे न्यायालयाचा मनाई आदेश असताना आमदार संग्राम जगताप यांच्यासह जातीवादी संघटनेने दर्ग्यात घुसून दर्ग्याच्या विटंबना करून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अल्पसंख्याक विकास मंडळाचे शोएब खाटीक आणि समस्त मुस्लिम जमात ट्रस्टचे डॉ परवेज अशरफी यांनी महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान साहेब यांच्या कडे तक्रार केली होती. सदर तक्रार अल्पसंख्यांक समाजाशी निगडित असल्याने आयोगाने याचा गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना कारवाई करून आदेशा 7 दिवसाच्या आत पाठवण्याचे आदेश दिले आहे. नाही तर राज्य अल्पसंख्यांक आयोग 2012 कलम 10 (क) नुसार सुनावणी ठेऊन सर्व संबंधितांना आयोग समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येईल, याची नोंद जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सांगितले आहे.आता नगर जिल्हा पोलिस अधिक्षक आणि जिल्हा अधिकारी यांची भूमिके कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराबाबत संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. या आमदारावर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्यात यावी. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा घेऊन जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी करावी. या आमदाराने विधानसभा सदस्याची घेतलेल्या संविधानीक शपथीचा भंग सुद्धा केलेला आहे. त्यामुळे यानुसार सुद्धा कारवाई करण्यात यावी.

सराज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी तातडीने या बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराच्या लवकर मुसक्या आवळाव्यात अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लीम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!