बारामती : येथील १७२९ आचार्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जेईई अडव्हान्स परीक्षेमध्ये मोठे यश संपादन केले आहे. हे विद्यार्थी आता आयआयटी, आयआयएम सारख्या देशात सर्वोत्तम शिक्षणसंस्थांमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरले आहेत.
अक्षदा शितोळे (सीआरएल पीडब्य्लूडी रॅंक २२५ ), मंदार राजमाने (सीआरएल रॅंक ५५३), सृष्टी शिंदे (जनरल ईडब्यूएस रॅंक – १२९३), विराज गाडेकर (ओबीसी एनसीएल रॅंक १८९७ ), प्राजक्ता टेंगले – (ओबीसी एनसीएल रॅंक १९९२ ), सामवेद उतेकर – ( सीआरएल रॅंक २०४१), विश्वजित कांबळे – ( एससी रॅंक ५००६ ), सार्थक आढाव – ( सीआरएल रॅंक ८८८० ), साईशा निंबाळकर – (जनरल ईडब्ल्यूएस रॅंक – ३६४७ ), तनिषा शितोळे – ( जनरल ईडब्ल्यूएस रॅंक – ६४०१ ), चैतन्य खरात – ( ओबीसी एनसीएल रॅंक – ५१६७ ), प्रेम सानोने – (ओबीसी एनसीएल रॅंक – ६९८० ), सुदर्शन दुधाळ – ( ओबीसी एनसीएल रॅंक – ७६४३ ), यज्ञेश जाधव – ( सीआरएल रॅंक १४४३३ ),मयुरेश नांदे – ( सीआरएल रॅंक ३२६७८ ) या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी ही परीक्षा उर्तिर्ण केली आहे.
जेईई मेन्स या परीक्षेत उर्तिर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी जेईई अडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र ठरतात. जेईई अडव्हान्स ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील काही अवघड परीक्षांमध्ये एक मानली जाते. ज्या विद्यार्थ्यांना आय़आयटीमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे असेच विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यावर्षी या परीक्षेसाठी १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, यापैकी केवळ ५४३७८ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत अशी माहिती १७२९ आचार्य अकॅडमीचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी दिली.
यातही आयआयटी बॉम्बे अंतर्गत अवघे ११२२६ विद्यार्थीच परीक्षा उतिर्ण होऊ शकले आहेत, यामध्ये आचार्यच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरवर्षी बारामतीहून ही परीक्षा उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळेंसह संचालक सुमीत सिनगारे, कमलाकर टेकवडे आणि प्रविण ढवळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.