स्वत: बरोबर समाजाचा विकास करणारे ‘आलताफभाई!’

दि मुस्लीम को-ऑप बँक लि., पुणेचे संचालक व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे निकटवर्ती आलताफ हैदरभाई सय्यद यांचा 23 ऑक्टोबर वाढदिवसानिमित्त…

मंजिलें उन्हीं को मिलीहै जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है।

या वाक्याप्रमाणे आलताफ सय्यद यांनी कोव्हीड महामारीनंतर प्रत्येक समाजाची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीस आलेली होती. मुस्लीम समाज यामध्ये जास्तच पिछाडीवर होता. अशात महाराष्ट्र शासनाने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती कर्ज योजना सुरू केली. बघता बघता साडे चार कोटी रूपये मंजूर करून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले. हातावरचे पोट असणार्‍यांना आर्थिक परिस्थितीतून सावरण्याची शक्ती मिळाली. समाजाला धीर देण्याचे काम त्यांनी केले.

स्वत:च्या विकासाबरोबर माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे हा उद्देश मनी बाळगून त्यांनी काम सुरू केले. पुन्हा सदरची योजना शासनाने सुरू केली. पाहता पाहता 250 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 लाख आणि 30 बचत गटाला प्रत्येकी 2 ला याप्रमाणे 8 कोटी 10 लाख रूपये मंजूर करून आणले. आतापर्यंत त्यांनी 10 ते 15 कोटी रूपये एकमेव बारामती तालुक्यासाठी आणला ही खूप मोठी विशेष बाब आहे. आज कित्येकांचे शुभाशिर्वाद त्यांना लाभलेले आहे. कित्येक कुटुंबांना आर्थिक आधार मिळालेला आहे. ज्यांची समाजात पत गेली होती त्यांना पत निर्माण करून दिली आहे.

तरी सुद्धा समाजात काही विघ्नसंतोषी लोकं असतात त्यांच्या मते काय केले आलताफ सय्यदने! मी तर म्हणेल नावं ठेवणार्‍यांनी किमान पाच प्रकरणे मंजूर करून कृतीत उतरावी मग समाज सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेईल.

वरील रक्कम मंजूर करण्यासाठी कोणा कोणाची हॉंजी..हॉंजी करावी लागली असेल किती वेळा मुंबईला जावे लागले असेल, कागदपत्रांचा ढिगारा घेऊन जिल्हा कार्यालय, विभागीय कार्यालय व शेवटी मुंबईला जावून मंजूरी पत्र तयार करून ते प्रत्येकाला वाटप केले. मंजूरी वाटपानंतर पैसे मिळेपर्यंत आलताफ सय्यद यांचा जीव मुठीतच राहणार आहे.

आलताफ सय्यद हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी उच्च शिक्षण घेणार्‍या समाजातील मुला-मुलींना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे त्याचा आकडा सुद्धा 10 ते 15 कोटीच्या वर आहे. आलताफ सय्यद यांनी समाजाची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.

प्रत्येक वेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या कार्यकर्त्यांना काही तरी केले पाहिजे ही भावना सतत मनात बोचत होती. त्यांनी या सर्वांना बरोबर घेऊन विश्र्वासाने एकता हौसिंग सोसायटीची स्थापना केली. बारामतीच्या हाकेच्या अंतरावर अडीच एकरचा शेती प्लॉट घेऊन त्यास एन.ए. करून प्रत्येकी 1 गुंठ्याचा प्लॉट दिला आहे. सदरची वार्ता तालुक्यात कळताच समाजातील मंडळींनी यामध्ये सामील करून घेणेबाबत तगादा लावला. मात्र, जागेअभावी त्यांना नकार द्यावा लागत आहे.

बारामतीच्या राजकारणात व समाजकारणात मोठ-मोठी व्यक्ती होऊन गेले तर काही काम करीत आहेत. त्यांनी मोठ-मोठी विविध पदे सुद्धा भूषविली आहेत. मात्र समाजाचं आपण काही तरी देणं लागतो याचा त्यांना विसर पडलेला आहे. आलताफ सय्यद यांनी समाजासाठी केलेले काम न भूतो न भविष्यतो असे आहे. बारामतीच्या इतिहासात एवढं मोठं काम कोणी केले नसेल हे ही छाती ठोपणे सांगू शकतो.

निंदणाचं घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे आलताफ सय्यद पुढे चालतच गेले आणि चालतच आहेत. विशेष म्हणजे ते एकटे चालत नाही तर सर्वांना बरोबर घेऊन चालत आहेत.

एकता फिटनेस सेंटर, एकता इग्लिश मिडीयम स्कूल, एकता महिला नागरीक सहकारी पतसंस्था, एकता ग्रुप इ. उभारणी केली. या सर्वाची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या पत्नीस म्हणजे तरन्नुम सय्यद यांना बारामती नगरपरिषदेवर नगरसेवक, सभापती व उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली.

या सर्व कार्यात त्यांचे मामा बा.न.प. शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, पत्नी मा.उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद, मामे भाऊ सहारा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेज सय्यद, तबरेज सय्यद, भाऊ महेबुब सय्यद, पुतणे इ. मोलाची साथ मिळत आहे.

आलताफ सय्यद यांनी सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात खुप मोठे काम केलेले आहे. प्रामाणिक, विश्र्वासाने मुस्लीम समाजाला एका विचार मंचावर आणले आहे. यानिमित्ताने मला एक वाक्य आठवले…

स्वागत है उनका जो मेरा रास्ता रोकते है, शेर तो तब भी नही रूकता जब 100 कुत्ते भोकते है।

संस्कारो ने खामोश रहना सिखाया है, वरना जुबान और जवाब हमारे पास भी है।

संपादक – तैनुर शेख,बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!