भिगवण(प्रतिनिधी-योगेश गायकवाड): एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकते हे दाखवून देणाऱ्या पुण्यलोक अहिल्यादेवी होळकरी यांची 300 वी जयंती महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रयमामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराजभैय्या भरणे यांच्या उपस्थितीत तक्रारवाडी आंबेडकरनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य हनुमंत बंडगर, राणीताई आढाव, तक्रारवाडीच्या सरपंच मनिषाताई वाघ, सीमाताई काळंगे, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महागडे संपत बंडगर, सौ.संगीता आढाव, सौ.तनुजा आढाव, तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्या संगीता वाघ, सौ.कोंडेताई, ग्रामविकास अधिकारी सौ.जाधव, सतीश शिंगाडे, प्रशांत वाघ, वैभव आढाव, डॉ.बाळासाहेब भोसले, युवा नेते सचिन आढाव, हेमंत भोसले, भाऊसाहेब वाघ, उमेश आढाव, श्रीनिवास शेलार, हनुमंत आढाव, बलभीम आढाव, महादेव सकुंडे, कुंडलिक भोसले इ. मान्यवर उपस्थित होते.