नीरा भीमाचा 1.5 लाख मे.टन गाळप पूर्ण: 2800 प्रमाणे हप्ता जाहीर – लालासाहेब पवार

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): कारखान्याने संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये आज अखेर 1.5 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले असून ऊस बिलाचा हप्ता प्रति टन रू.2800 प्रमाणे जाहीर केला असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सांगितले.

शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2024-25 च्या उस गळीत हंगामाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये आज वर्ग केली जाईल, अशीही माहिती यावेळी पवार यांनी दिली.

या गळीत हंगामामध्ये दि.15 डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊस बिलाची रक्कम उद्या शुक्रवारी उस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. निरा भिमा कारखान्याकडून चालु हंगामामध्ये गाळप होणार्‍या उसाची बिले नियमितपणे शेतकर्‍यांना अदा केली जाणार आहेत. तरी शेतकर्‍यांनी कारखान्यास गळीतास जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व संचालक मंडळाने केले आहे.

यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, तानाजीराव नाईक, राजकुमार जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!