बारामतीः महाराष्ट्रात जातीयवाद पाळणारा कोणी मंत्री असेल तर तो म्हणजे अजित पवार असा आरोप शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
ते पुढे म्हणाले की, “अजित पवारांनी एससी-एसटी, ओबीसींचा निधी अडवला होता” असा आरोप भुजबळ-गावितांचा दाखला देत त्यांनी केला. ते असेही म्हणाले की, राज्यातील ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी शपथ घेऊन सांगावं की, अजित पवारांनी ओबीसींचा निधी थांबवला नव्हता का? एससी (अनुसूचित जाती), एसटी (अनुसूचित जमाती) आणि ओबीसी (इतर मागासवर्ग) या तिन्ही विभागांसाठी असलेला निधी थांबवण्यों काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या अजित पवारांनी केले तेच आता आमच्यावर टीका करतात.
अजित पवार यांनी वंषावरून दिलेल्या प्रतिक्रीयेबाबत आव्हाड म्हणाले की, तुम्ही काय ते वंश..वंश.. लावून ठेवलेय. आज तुम्हाला जे काही मिळाले आहे ते केवळ वंशापोटी मिळालं आहे. मुळात तुमचे कर्तृत्व काय आहे? शरद पवार नसते तर आज तुम्ही कुठे असता? आमचे कर्तृत्व होतंे म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्ही मेहनत केली आणि शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद दिले, म्हणून आम्ही इथे आहोत. आम्ही रस्त्यावर आंदोलने केली. आम्ही रस्त्यावरची पोरं होतो, रस्त्यावर लढायचो, मारामार्या करायचो, पोस्टर फाडायचो, पोस्टर लावायचो, पेपर जाळायचो. शरद पवारांविरोधात कोणीही बोलले, अगदी मुख्यमंत्रीदेखील बोलले तरी त्यांच्या अंगावर जायची ताकद ठेवायचो. पण तुम्ही काय केलंय.” जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दावा केला की, अजित पवार यांच्यामुळे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले.