निरावागजः 446 कोटीचे कर्ज करून ठेवले, 76 लाखाच्या बेअरींग शिल्लक असताना 111 कोटीच्या बेअरींग घेतल्या, गोडाऊन बांधण्यासाठी अंदाजपत्रकाच्या वर म्हणजे 82 लाख 19 हजार 656 रूपयेचे जास्तीचा खर्च केला. तरीही 60 हजार साखर पोती भिजली. कामगार प्रचार करतात म्हणून खोटे नाटे फौजदारी गुन्हे दाखल केले. सांडपाणी वाहुन नेण्यासाठी 4 गाड्या लावल्या त्याचे 71 लाखाचे बिल झाले. नेत्यांचे खाजगी कारखाने 17 हजार गाळप क्षमतेचे आपण अडीच हजाराहून साडे सात हजार केला तर 26 लोकं कोर्टात गेली. विशेष चुकीच्या पद्धतीने काम करणारी व ज्या ठिकाणचे कारखाने बंद आहेत त्या परिसरातील लोकं म्हणतात मत द्या असे सर्व विषयांवर ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी बोलताना सांगितले.
आज निरावागज याठिकाणी ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ चा प्रचाराचा नारळ वाढविताना श्री.तावरे यांनी विरोधकांवर टिका केली. यावेळी रंजनकाका तावरेंसह इतर आजी माजी संचालक व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे चंद्रराव तावरे म्हणाले की, घरातील कारभारी चुकीचा वागला तर घराला घरपण राहत नाही तशी अवस्था आपल्या कारखान्याची होऊन द्यायची नाही. चालू संचालक मंडळाने 446 कोटीचे कर्ज करून ठेवले जे कधी माळेगावच्या सभासदांनी पाहिले व ऐकले नाही. सन 2015 ते 2020 च्या काळात 109 कोटींची देणी दिली आणि सर्व खाती निल केली. यामध्ये मुदत ठेव, गेटकेन मुदत ठेव, खरेदी अनुदान, सभासद खरेदी अनुदान, व्यापारी देणी इ. समावेश होता.
आपल्या काळात 193 कोटीची विस्तार केला. यामध्ये डिस्टलरी, गोडाऊन, शेततळे, इ. सगळ्या गोष्टी केल्या. मी स्वतः जावून चौकशी केली असता 116 कोटीचे कर्ज होते. 446 कोटी कुठून काढले, त्यावर अकौंटमधून सांगण्यात आले साखर होती त्या साखरवरची पोत्याची उचल धरली पण साखरेची किंमत धरली नाही. अशा सगळ्या चुका आहे, खोटे आकडे सांगायचे खोटं नाटं सांगायचे असला कुठे कारभार चालतो का? असेही ते म्हणाले.
गोडाऊन बांधले इस्टीमेट पेक्षा जास्त पैसे दिले. साडेतीन लाख पोतं ठेवले ते प्लास्टीकची पत्रे मारली ते वाऱ्याने उडाली. 43 हजार पोतं भिजली, सांडली. परवा पाऊस झाला त्यात साडे नऊ हजार पातं भिजली तर दुसऱ्या गोडाऊनमध्ये 60 हजार पोतं भिजली. प्रत्येकी साखर पोत्याला 1900 रूपये तर किती पैसा पाण्यात गेला याचा विचार करणे गरजेचे आहे.
सांडपाण्याचा प्लॅन केला. त्यास मशिनरी घेतली टेबल बसवला प्रथमतः 22 लाखाचे घेतले नंतर ते घराब झाले 46 लाखाचे घेतले. सध्या त्यांनी 3636 रूपये भाव दिला. 4 हजार 320 पासून 3 हजार 800 रूपयांपर्यंत साखर विक्री केली आहे त्यामुळे भाव किती बसला पाहिजे हे तुम्हीच बघा असेही ते म्हणाले. 36 कोटीच्या डिस्लरीवर 100 कोटी कर्ज काढले. घाण पाण्याची तक्रार आली. सांडपाण्याची टाकळी रानात टाकू असे सांगण्यात आले. सदरचे पाणी वाहुन नेण्यासाठी चार गाडया 15 दिवस काम करीत होत्या 71 लाख 15 हजार रूपये बिल झाले हे तुम्हाला पटत का असेही ते म्हणाले.

90 कोटीचा निधी दिला असे सतत सांगत आहेत. या 90 कोटीत एच्छिक ठेवी 33 कोटी त्या आमच्या काळात झाल्या. त्यांच्या काळात 60 कोटी झाल्या. 18 कोटीने शेअर्स वाटले. कुठून तुम्ही निधी दिला असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कारखान्यात काम करणारा कामगार तुमचा आमचा सर्वांचा आहे. आमचा व त्यांचा कामगार प्रचार करतात हे नाकारू शकत नाही. मात्र, आमचा प्रचार करणाऱ्या कामगारावर खोट्या फौजदारी खटले दाखल केले. कामगारांनी मे.उच्च न्यायालयात दाखल केले कोर्टाने त्याचा कामगारांच्या बाजुने निकाल दिला. असे माळेगावच्या 50 ते 60 वर्षाच्या काळात असे कधी झाले नाही असेही ते म्हणाले.
कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या आदेशावरून 65 लाखाची कामे केली. कार्यकारी संचालकालाच मालक का करीत नाही असेही ते म्हणाले. चेंबरची कामे 19 हजार, पाईपलाईन टाकायची होती त्याचे 21 लाख बिल केले. कारखाना परिसरात मुरूम टाकला 25 लाखाचा असा खर्च केला.
संचालक मंडळाला नेत्यांनी कारखान्याचा विस्तार करा म्हणून कधी सांगितले नाही. 4 वर्ष कारखाना नीट चालला नाही. आपल्या काळात विस्तार केला म्हणून कोर्टात गेले. माळेगावचा 4 हजार 500 वरून 7 हजार 500 चा विस्तार केला तो चालत नाही. मात्र नेत्यांचा मालकीचा खाजगी कारखाना 17 हजारावर विस्तार केलेला चालतो. माळेगावच्या हितासाठी काही नाही केले. काही मंडळी, काय नाही नुसतं मागे फिरतात. त्यांनी पाच वर्षात फक्त एक गोडाऊन बांधले आणि पावसात 60 हजार साखर पोती भिजली.
मागील वर्षी 76 कोटीच्या बेअरींग शिल्लक असताना 111 कोटीच्या बिअरींग खरेदी केल्या कशासाठी केल्या हे सभासदांनी समजून घेतले पाहिजे. हे असे चालले तर कारखान्याचा येणारा काळ कसा असेल हे ज्योतिषीला सांगण्याची गरज नाही. नेत्यांना खासदारकी, आमदारकीला आमचे वय दिसत नाही आताच बरं वय दिसले. 11 गाव जोडू नका आपण विरोध केला त्यांना सुद्धा नेत्यांनी कोर्टात पाठविले.
छत्रपतीला ज्याप्रमाणे केले ते इथे करायचे आहे. कोणी प्रपंच मोडत असेल, तर ऐकून घ्यायचे का, आपल्या परिसरातून कारखाना काढला तर आपल्या पदरात काय राहते का बघा. छत्रपतीची काय अवस्था आहे. मोडीत निघालेला अंबालीका कारखाना आज जोमात चालतो मालक तोच आहे. पुन्हा याच नेत्यांनी म्हणायचे माझी उणं धुणं काढले तर माझ्याशी गाठ आहे अशी दमदाटी करायची. मागच्या चेअरमन निवडला अडीच कोटीचा लिलाव झाला पैसे पक्षाला मिळाले खरं खोटं ते माहित नाही. आता तर चेअरमन पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. मला चेअरमन करा मी 5 कोटी, 10 कोटी देतो. सर्व पैसे देणारे धनदांडगे आहेत.
ज्याचे कारखाने बंद आहेत, ज्यांचे चुकीचे सुरू आहे ते सांगायला येतात मते द्या. कारखान्याचा विस्तार करताना मे.कोर्टात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 82 लाख टन ऊस आहे त्याचे काय करायचे असे कोर्टासमोर बाजू मांडली. मे.कोर्टाने सांगितले तुमचं काम सुरू ठेवा असे सांगितले. सुत गिरणी माळेगाव कारखान्याच्या हद्दीत पाहिजे अशी अट टाकली होती त्यावेळी 1 कोटी जमा करण्यास सांगण्यात आले होते त्यावेळी 90 लाख दिले सध्या त्या सुतगिरीणीच काय अवस्था आहे. कारखाना परिसरात दूध संघ करावयाचा होता. शेतकऱ्यांच्या मुलांना जोडधंदा मिळाला असता तो केला नाही.
काही मंडळी घरी येऊन सांगतो, काय सांगू तुला दादा माझ्याकडून बघून हसले असे म्हणून दिवस काढीत आहे. निवडणूक काळात हीच मंडळी लक्ष्मी घेऊन येतील, लक्ष्मी टाळू नका घ्या यांच्या कुठे कष्टाची आहे पण, सहकार बचाव शेतकरी पॅनेल बहुमताने निवडून आल्यावर खिसा फाटेपर्यंत पैसे घेऊन जा असेही ते म्हणाले.
समझोता करण्यासाठी अर्धी रात्र झोपच नाही. याकाळात राजवर्धन शिंदे आले, विक्रम भोसले आले, किरण गुजर दोन वेळा आले. नितीन सातव पाच ते सात वेळा आले, छत्रपतीचे चेअरमन दोन ते तीन वेळा आले या सगळ्यांना म्हणालो, आम्हाला कारखाना वाचवायचा आहे. या काळात दमदाटी सुरू होईल. जेवताना कोणी ताटात पाणी टाकत असेल तर गप्प बसायचे का असेही ते म्हणाले. केलेल्या कष्टाचे दाम आपल्याचा मिळायला पाहिजे हे आपला हक्क आहे.
नेत्यांच्या ताब्यात महाराष्ट्र बँक, जिल्हा बँक असताना, छत्रपती कारखान्याला 50 कोटी रूपये दिले असते तर तो कारखाना जगला असता असेही चंद्रराव तावरे यांनी सांगितले.
रंजनकाका तावरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,
ही ऐतिहासिक निवडणूक आहे. होत्याचे नव्हते झाले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी भरावी लागली. ही लढाई परिवर्तनाची, मुला बाळांच्या भवितव्याची व वाडवडिलांनी उभा केलेल्या मालकत्वाची लढाई आहे. सभासदांच्या डोळ्यात आलेले पाणी येणाऱ्या काळात निश्चितच तुमच्या प्रपंचाचा खेळ करणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडणाऱ्याला कारखान्याचे आकडे कळत नाही. कारखान्याची आर्थिक अवस्था अशी कधी नव्हती ती होऊन बसली आहे. डिस्टलरीवर कधीच कर्ज काढावे लागले नाही, 100 कोटीचे कर्ज काढले आहे. माळेगाव कारखान्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही.
गाळप कमी झाले, सभासदाच्या डोक्यावर कर्ज झाले, कांडे पेमेंट कर्जाशिवाय मिळाले नाही. माळेगावची अवस्था छत्रपतीच्या गतीवर आलेली आहे. आता आपण जागे झालो नाही तर भविष्यात आपली पिढी आपणाला माफ करणार नाही. नेत्याच्या स्वार्थासाठी हे सगळं सुरू आहे. ही निवडणूक खाजगी विरूद्ध सहकाराची आहे. आमदार, खासदारकीची लढाई नसून, घरचा प्रपंचाची लढाई आहे. घरात भगिनीला पैसे कमी पडले तर तिला तोडमोड करून संसार करावा लागतो. येणाऱ्या काळात माय भगिनींना समाधानाची झोप येण्यासाठी जागे व्हा आणि किटलीच्या चिन्हासमोर शिक्का मारून आपले अमूल्य मत द्या असेही ते म्हणाले.
संपूर्ण देशाचे लक्ष माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीवर लागलेले आहे. आता एकाने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री काटेवाडीच्या ग्रामपंचायतीला उभे राहतात की काय असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. येणाऱ्या काळात कॉलेज तुमचं राहिले पाहिजे, मुलं तुमची शिकली पाहिजे, नाहीतर पोटनियम बदलून विद्या प्रतिष्ठानला जोडल्याशिवाय राहणार नाही. मुलांचे जीवन अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. घरातील लक्ष्मीचे स्वातंत्र्य अबाधीत राहण्यासाठी सद्बुद्धी दे आणि किटलीच्या चिन्हावर शिक्का मारून परिवर्तनाच्या लाटेत सहभागी व्हा.